Thursday, July 21, 2011

Marathi Poem - काही आठवणी विसरता येत नाहीत.....!!!

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत
गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल
शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.......

Monday, July 11, 2011

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...
एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते
पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते
लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते
ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते
बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते

Friday, July 1, 2011

असं प्रेम करावं.....



थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन ""अरे चा "अगं" करावं
असं प्रेम करावंजग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावंवर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं
प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं  
विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं 
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ....