Sunday, August 15, 2010

जी माणसे हवीशी वाटतात

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही

ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते

जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही

]जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात
अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे
असे आयुष्याच्या शेवटी कळते

जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो

नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागत......

No comments:

Post a Comment